"मेट्रो मार्गाचे काम चालू राहील, पण
कारशेडचे काम थांबवण्यात आले आहे", असे तुम्ही
जाहीर केलेत, पण मेट्रो मार्ग आणि कार शेड, हा एकच इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे, हे तुम्हाला
माहिती नाही काय? कार शेड शिवाय, नुसता मार्ग तयार करून काय साधणार आहे?
मेट्रो प्रकल्पाचा एकेका तासाचा खर्च कित्येक कोटी
रुपये असताना, टनेलिंगसह सर्व कामे अर्धवट अवस्थेत पोचलेली असताना, हा प्रोजेक्ट थांबवून, तुम्ही नुसते हजारो कोटी
रुपये वाया घालवत नाही आहात, तर हा प्रोजेक्ट रिव्हाईव
करताना, त्याची कॉस्ट काही पटीत वाढणार असल्याने, आमच्याच खिश्यांवर कररुपी बोजा वाढवून ठेवणार आहात... कामे अर्धवट
राहिल्याने वाहतुकीचा लाँगटर्म बोजवारा उडणार आहे, तो
वेगळाच.
आधीच्या सरकारने चालू केलेले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट
थांबवलेत, तर महाराष्ट्रात पैसे गुंतवायला गुंतवणूकदार कुठून
मिळणार, हा विचार तुम्ही करू शकत नाही?
सत्ता लालसेने आणि वैयक्तिक आकसापोटी, आधीच
तुम्ही भाजपा बरोबर केलेली निवडणूकपूर्व आणि नैसर्गिक युती तोडून, अनैसर्गिक मित्रांची सोबत केली आहेत, त्यातून
तुम्ही मुंबईकरांच्या हालअपेष्टांमधे भरच घालणार असाल, आणि
वाढलेला खर्च भागवण्यासाठी जनसामान्यांचे खिसे कापणार असाल, तर मुंबईकर तुम्हाला पुढच्या निवडणुकीत तुमची जागा दाखवून देतील, हे नक्की.
डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवल्याचे संपूर्ण पाप, तुमचे
नवीन मित्र तुमच्यावर ढकलणार आहेत, आणि स्वतः
नामानिराळे रहाणार आहेत... तुमचा पक्ष नामशेष झाला, तर
त्यांना काहीच फरक पडणार नाहीये, इन फॅक्ट त्यांना
आनंदच होणार आहे... तुमचे डोळे लवकर उघडावेत, ह्यासाठी
शुभेच्छा!
- शरद केळकर
